विद्यापीठातील विविध विभागांनी कृषी निविष्ठांच्या विक्रीतून आत्मनिर्भर होणे गरजेचे - कुलगुरू डॉ . शरद गडाख

विद्यापीठातील विविध विभागांनी कृषी निविष्ठांच्या विक्रीतून आत्मनिर्भर होणे गरजेचे - कुलगुरू डॉ . शरद गडाख

*विद्यापीठातील विविध विभागांनी कृषि निविष्ठांच्या विक्रीतून आत्मनिर्भर होणे गरजेचे* *- कुलगुरु डॉ. शरद गडाख*

          महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असणार्या विविध विभागांमार्फत बी-बियाणे, कलमे रोपे, जैविक खते व जैविक औषधे इ. निर्मिती केली जाते. या विभागांनी तयार केलेल्या या विविध कृषि निविष्ठांच्या विक्रीमुळे त्यांना आर्थिक फायदा होवून विद्यापीठ महसुलात भर पडते. याकरीता या विभागांनी जास्तीत जास्त निविष्ठा तयार कराव्यात जेणेकरुन या निविष्ठांच्या विक्रीतून संबंधीत विभाग आत्मनिर्भर होतील असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठात रब्बी आढावा व खरीप नियोजन 2025 या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. शरद गडाख बोलत होते. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे व बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नितीन दानवले उपस्थित होते. 

            या बैठकीमध्ये कुलगुरु डॉ. शरद गडाख यांनी विद्यापीठ कार्यक्षेत्रांतर्गत संशोधन केंद्रावरील रब्बी बीजोत्पादन, कलमे, रोपे, जैविक खते औषधे यांचा एकत्रित आढावा घेतला. यावेळी त्यांनी विद्यापीठाचे दर्जेदार उत्पादनाची शेतकर्यांना माहिती होण्यासाठी सर्वच संशोधन केंद्रांनी खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच कार्यशाळा आयोजित करून जास्तीत जास्त शेतकर्यांपर्यंत विद्यापीठाचे आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती द्यावी अशी सूचना केली. या बैठकीमध्ये डॉ. नितीन दानवले यांनी सादरीकरण केले. यावेळी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विविध विभागांचे विभाग प्रमुख, प्रमुख शास्त्रज्ञ, विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व बिजोत्पादक शास्त्रज्ञ तसेच राष्ट्रीय बियाणे महामंडळ, महाबीज यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.