कारेगाव येथे रस्त्याच्या कारणावरून शेतकरी कुटुंबावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला.

अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी //
दादागिरीचा कळस
श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथील चव्हाण वस्ती परिसरात आरोपी महेंद्र मच्छिंद्र भोसले वअशोक मच्छिंद्र भोसले यांनी कायमस्वरूपीचा वहिवाटीचा सार्वजनीक रस्ता ,रस्त्यावर दगड टाकून अडवला . रस्ता अडवल्यामुळे किरण गंगाधर ठोकळ यांचा येणे जाण्याचा रस्ता बंद झाला .
सदर गोष्टीची विचारणा केली असता आरोपींनी अतिशय टोकाची भूमिका घेत घरात जाऊन कत्ती हे धारदार शस्त्र व लोखंडी रॉड आणला आणि फिर्यादी किरण ठोकळ यांच्यावर जीव घेणे हल्ला केला .
जवळच असलेले त्यांचे कुटुंबीय त्यांना वाचवण्यासाठी आले असता फिर्यादी यांच्या पत्नी पूजा ठोकळ, आई वैशाली ठोकळ, भाऊ अमोल ठोकळ व वडील गंगाधर ठोकळ यांच्यावर देखील आरोपी अशोक व महेंद्र यांनी जीवघेणा हल्ला केला.
फिर्यादि यांचे वडील गंगाधर ठोकळ यांना गंभीर दूखापत झाली आहे.
महेंद्र भोसले यांनी किरण ठोकळे यांच्या डोक्यावर मागच्या बाजूने कत्तीने वार केल्याने ते जखमी झाले असून प्रचंड प्रमाणात रक्त श्राव झाला. त्यांची रक्ताने माखलेले गंभीर अवस्था पाहून पाहूण फिर्यादी यांची आई वैशाली गंगाधर ठोकळ या जागीच बेशुद्ध झाल्या .गंगाधर ठोकळ यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने जोराचे वार करण्यात आले.
या सर्वांना जखमी अवस्थेत तातडीने श्रीरामपूर येथील साखर कामगार ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचार सुरू आहे.
एकीकडे शासन शेतकऱ्यांना रस्ता उपलब्ध करून देत आहे तर दुसरीकडे रस्त्याच्या कारणावरून शेतकरी कुटुंबावर जीवघेणा हल्ला होतो ही मोठी शोकांतिका आहे.
संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शिंदे यांच्याकडे असून आरोपी मात्र अद्यापही मोकाट आहे .
संबंधी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांना पाठिशी न घालता तातडीने वैद्यकीय अहवालाच्या आधारे आरोपींवर प्राणघात हल्ल्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून ताब्यात घ्यावे .
अशी मागणी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाकडून करण्यात येत आहे.