रेनोवेट इंडियाचा वर्धापन दिन: महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांचे एकत्रीकरण.

रेनोवेट इंडियाचा वर्धापन दिन: महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांचे एकत्रीकरण.

रेनोवेट इंडियाचा वर्धापन दिन: महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांचे एकत्रीकरण.

प्रतिनिधी_प्रसाद घोगरे_९३७०३२८९४४.

मुंबई, २४ मे २०२५ – तळागाळातील सामाजिक संस्थाच्या सक्षमीकरणासाठी गेली दहा वर्षे कार्यरत असलेल्या रेनोवेट इंडिया या अग्रगण्य संस्थेचा दहावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. मुंबईतील भायखळा (पूर्व) येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात पार पडलेल्या या सोहळ्यात महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातून ३५० हून अधिक सामाजिक संस्थांचे ५00 पेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी झाले होते. दीपप्रज्वलना नंतर रेनोवेट इंडियाचे सहसंस्थापक श्री अलोक कदम यानी स्वागतपर भाषणातून रेनोवेट इंडियाच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. त्यानंतर "रेनोवेट इंडियाचा १० वर्षांचा प्रवास" हे विशेष ऑडिओ-व्हिज्युअल सादरीकरण सादर करण्यात आले.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मीना गालियारा, श्री. निखिल पंत आणि श्री. प्रेम यादव यांनी उपस्थित राहून प्रेरणादायी विचार मांडले. श्री. प्रेम यादव यांनी प्रथम इन्फोटेक फाउंडेशनच्या प्रवासाचा आढावा घेत एनजीओंनी केवळ सीएसआर निधीवर अवलंबून न राहता स्थानिक संसाधनांचा प्रभावी वापर करावा, असे सांगितले. त्यांनी रेनोवेट इंडियाने GB अ‍ॅप्लिकेशनद्वारे देशभरातील ग्रासरूट संस्थांपर्यंत पोहोच वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

श्री. निखिल पंत यांनी २०१३ पासून २०२५ पर्यंतच्या सीएसआर धोरणातील प्रवासाचा आढावा घेतला. तसेच कॉर्पोरेटसाठी बदलत्या सीएसआर अनुपालनाच्या प्रवृत्तींवर सखोल दृष्टिक्षेप टाकला. 

डॉ. मीना गालियारा यांनी एनजीओ क्षमतावृद्धी, संस्था विकास आणि उत्तरदायित्वावर भाष्य करत, सामाजिक संस्थांसाठी आर्थिक व्यवस्थापन, निरीक्षण, मूल्यांकन व सातत्यपूर्ण शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या भाषणातून संस्थात्मक बळकटीसाठी दिशादर्शक मार्ग मिळाले.

रेनोवेट इंडिया’च्या दहा वर्षाच्या प्रवासाच्या पुस्तक प्रकाशनाचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर रेनोवेट इंडियाचे डायरेक्टर सनी पवार आणि  निनाद खानविलकर यांनी GB Academy आणि संस्था उपयोगी कॅलेंडर संकल्पनेचे सविस्तर सादरीकरण केले.

रेनोवेट इंडियाचे सहसंस्थापक श्री प्रथमेश  रावराणे यानी रेनोवेट  इंडियाचे  “व्हिजन २०३५ मांडले  आणि कार्यक्रमाचा समारोप केला. रेनोवेट इंडियाचे डायरेक्टर केविन यांनी आभार प्रदर्शन केले.

विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांनी या मंचाचा उपयोग करून एकमेकांशी संवाद साधला, नव्या भागीदारींच्या संधी शोधल्या आणि राज्यभरातल्या कार्यपद्धतींमध्ये सहकार्याची दिशा स्पष्ट केली. हा कार्यक्रम केवळ एक वर्धापन दिन नव्हता, तर सामाजिक संस्थांच्या ऐक्याची साक्ष देणारा महत्त्वाचा क्षण ठरला. रेनोवेट इंडियाचा दहावा वर्धापन दिन हा संस्था सक्षमीकरण, नव्या संकल्पना आणि भागीदारीला चालना देणारा एक मैलाचा दगड ठरला असून, या निमित्ताने संस्था सक्षमीकरणाच्या दिशेने आणखी एक ठोस पाऊल उचलले गेले आहे.