मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुलींना सायकल वाटप : आरोग्य शिबिराचे आयोजन.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुलींना सायकल वाटप : आरोग्य शिबिराचे आयोजन.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुलींना सायकल वाटप : आरोग्य शिबिराचे आयोजन.

नागपूर प्रतिनिधी_प्रसाद घोगरे_९३७०३२८९४४.

पायल पल्लवी गार्डन, न्यू मनीष नगर, नागपूर येथे आज एक सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला, ज्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून विविध उपक्रमांचे उद्घाटन केले.

मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचे आगमन सकाळी ११:१५ वाजता झाले. त्यांनी गार्डन परिसरात वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर त्यांनी आरोग्य तपासणी शिबिराची पाहणी केली, ज्यात ग्रामस्थांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.

स्वागत समारंभ

मुख्यमंत्र्यांचे स्वागत RBL बँके व भाजप दक्षिण-पश्चिम विभागा च्या संयुक्त कार्यक्रम, पायल पल्लवी गार्डन व  अनुबंध बहुद्देशीय संस्था न्यू मनीष नगर यांच्या अथक प्रयत्नाने पार पडला. RBL बँकेच्या CSR उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि आरोग्य तपासणी सुविधा पुरविणे हा होता.

मुख्यमंत्री यांचे भाषण

मुख्यमंत्री फडणवीस यांनी RBL बँकेच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांचे कौतुक केले. त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील कुटुंबांना शैक्षणिक आणि आरोग्यविषयक आधार मिळतो.

आर बी एल बँक यांनी आत्तापर्यंत गरजू विद्यार्थ्यांना ४८०० सायकल चे वाटप केलेले असून, चालू वर्षी तब्बल १८०० सायकल गरजू विद्यार्थ्यांना वाटप केल्या आहेत, सायकल व स्कूल किट वाटप मुळे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत होत असून, मुलींच्या शिक्षणाच्या टक्केवारीत देखील वाढ होईल, असा विश्वास आर बी एल बँक यांनी व्यक्त केला, मुलीला शिक्षित केल्यास समाजाचे परिवर्तन होईल, त्यामूळे आम्ही सायकल व स्कूल किट चे वाटप करून मुलीच्या चेहऱ्यावरील उत्साह वाढवून आमचा उद्दिष्ट पूर्ण करतो असे मत व्यक्त केले.

यावेळी प्रमुख आमदार संदीप जोशी, आमदार प्रवीण दटके, अश्विनी झिंजकर व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता..

आभार प्रदर्शन

कार्यक्रमाच्या शेवटी, आयोजकांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. विशेषतः:

दक्षिण-पश्चिम विभागातील सर्व कुटुंबांचे, ज्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.

पायल पल्लवी स्वयंसेवकांचे, ज्यांनी नाश्ता, पाणी आणि कार्यक्रम व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडली.

विशेष सुरक्षा दल, नागपूर पोलीस, NMC आणि इतर सर्व संबंधित संस्थांचे, ज्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.

हा कार्यक्रम सामाजिक एकात्मता आणि सहकार्याचे प्रतीक ठरला असल्याचे मत यावेळी आयोजकांनी व्यक्त केले.