पत्रकार जावेद शेख यांचा अनोखा उपक्रम, विद्यालयातील मान्यवरांच्या हस्ते स्कुल बस मधील विद्यार्थ्यांना केली मिठाई वाटप .

पत्रकार जावेद शेख यांचा अनोखा उपक्रम, विद्यालयातील मान्यवरांच्या हस्ते स्कुल बस मधील विद्यार्थ्यांना केली मिठाई वाटप .

सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे वाहन चालक जावेद शेख यांनी स्कूलबस मधील विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण करण्याचे काम केले आहे .सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ही तालुक्यातील नावाजलेली संस्था असून या विद्यालयांमध्ये राहुरी तालुक्याच्या अनेक भागातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात .मुख्य रस्त्यापासून अनेक खेडेगाव लांब असल्याने या विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत असे .पालकांनाही रोज शाळेत मुलांना नेऊन आणून सोडणे शक्य होत नसे .त्यामुळे काही भागातील व्यक्तींनी विद्यार्थी वाहतुकीसाठी स्वतः गाड्या घेऊन विद्यार्थी वाहतूक चालू केली .

            विद्यार्थ्यांना शाळेत जाणे येण्यासाठी स्कूल बसची सुविधा उपलब्ध झाल्याने या शैक्षणिक संस्थेकडे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा कल मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे .विद्यार्थी वाहतूक करणारे काही चालक .आपल्या गाडीतील विद्यार्थ्यांची व्यवस्थित काळजी घेत असल्याने पालकांची चिंता कमी झाल्याचे दिसून येत आहे .जावेद शेख यांनी वरवंडी परिसरातील विद्यार्थ्यांना विद्यापीठात जाणे येण्यासाठी गाडीचे सुविधा उपलब्ध केल्याने अनेक विद्यार्थी ते त्यांच्या वाहनातून घेऊन येण्याचे काम करत आहेत . वर्षभर आपल्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी लागणार असल्याने त्यांना आनंदित करण्यासाठी जावेद शेख यांनी मिठाईवाटप हा उपक्रम सुरू केला आहे .

         नुकताच झालेला ईदचा सन व विद्यार्थ्यांना मिळणारी उन्हाळ्याची सुट्टी या दोन्ही गोष्टींचा संगम साधून जावेद शेख यांनी आपल्या गाडीतील मुलांना मिठाई देऊन आनंदित करण्याचे ठरवले होते . शाळेच्या शेवटच्या दिवशी सावित्रीबाई फुले माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अरुण तुपविहीरे,उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे,विद्यालयाचे प्राध्यापक जितेंद्र मेटकर तसेच प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक खेत्री सर यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले .यावेळी विद्यालयाचे प्राध्यापक जितेंद्र मेटकर यांनी वाहन चालक हे विद्यार्थ्यांची वाहतूक करत असताना कशी काळजी घेतात हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले .विद्यार्थ्यांनीही वाहन चालक यांचा नेहमी आदर करावा अशाही सूचना विद्यार्थ्यांना दिल्या .जावेद शेख यांनी सुरू केलेल्या या उपक्रमासाठी विद्यालयातील उपस्थित मान्यवरांसहित सर्व विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या व त्यांचे आभार व्यक्त केले.