लोकनेते आदरणीय श्री. शरदचंद्र पवार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत आज राहुरी येथे भव्य प्रचारसभा संपन्न झाली.

लोकनेते आदरणीय श्री. शरदचंद्र पवार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत आज राहुरी येथे भव्य प्रचारसभा संपन्न झाली.
लोकनेते आदरणीय श्री. शरदचंद्र पवार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत आज राहुरी येथे भव्य प्रचारसभा संपन्न झाली.

             राहुरी ( प्रतिनिधी )  :-   संपूर्ण अहमदनगर दक्षिण तथा अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या परिवर्तनाची ही सुरुवात आहे याची जाणीव उपस्थित जनसमुदाय पाहून झाली. खरंतर आपण सर्वांनी एकच कुटुंबाला ५-६ दशके आपलं प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. मात्र, सेवेच्या संधीला सत्तेची संधी समजून त्यांनी नेहमीच जनतेच्या भावनांना केराची टोपली दाखवली. आशिया खंडातील पहिला साखर कारखाना असलेला आपला प्रवरानगर साखर कारखाना त्यांनी देशोधडीला लावला, कारखान्यावर जवळपास ८५० कोटींचा कर्जाचा डोंगर उभा केला. 

              अनेकांच्या कष्टाने उभ्या राहिलेल्या संस्था बंद पाडण्याचा जणू काही यांना छंदच आहे अशा पद्धतीने त्यांनी अनेक संस्था बंद पाडल्या. मतदारसंघात एकही मोठा प्रकल्प आला नाही, पाणीपुरवठा, सिंचन योजना पूर्ण झाल्या नाहीत.लोकप्रतिनिधींनी पाच वर्षांत किमान एकदा येऊन आपल्या समस्या जाणून घ्याव्यात अशी जनतेची अपेक्षा असते, आपल्या खासदारांनी मात्र निवडून गेल्यानंतर ५ वर्षे जनतेला वाऱ्यावर सोडलं. हे चित्र आपल्याला बदलायचं आहे, अनेक संस्थांना चालना द्यायची आहे, मोठे प्रकल्प आणायचे आहेत, ३६५ दिवस २४ तास उपलब्ध असणारा लोकप्रतिनिधी म्हणून मी आपल्या सेवेसाठी कटिबध्द असणार आहे. हा बदल घडवण्याची ताकद जनतेच्या हातात आहे, जनतेनेच ही निवडणूक हातात घेतल्याने आता परिवर्तन अटळ आहे हा विश्वास यावेळी व्यक्त केला.

               या सभेस आमदार श्री. प्राजक्त तनपूरे,आमदार श्री. लहू कानडे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.