बिल्ववनात धुराडया निमीत्त तरुणाईत जल्लोषाचे उधाण ..... !!!

बिल्ववनात धुराडया निमीत्त तरुणाईत जल्लोषाचे उधाण ..... !!!
बिल्ववनात धुराडया निमीत्त तरुणाईत जल्लोषाचे उधाण ..... !!!
बिल्ववनात धुराडया निमीत्त तरुणाईत जल्लोषाचे उधाण ..... !!!

श्रीरामपूर तालूक्यातील बेलापूर खु येथील हरिहर केशव गोविंद बनात धुराड्याच्या डफावरील कवण ( जुनी पूराण, रामायण ,महाभारतावर आधारीत ४ ओळीचे गीत ) आणी डफाच्या ठेक्यावरील लयबध्द नृत्य याला अनेक शतकांची परंपरा आहे .आधुनिकतेची कास धरलेल्या आपल्या सध्याच्या पिढीने याकडे दूर्लक्ष केल्यामूळे १०ते १५ वर्षांपूर्वी बनामधे डफाच्या ठेक्यावर ४- २ जेष्ठ वयोवृद्ध सोडले तर कुणीही हजेरी लावत नसत . सुमारे ३० वर्षांपूर्वी याच बना मधे यात्रेत उभे रहायला जागा पूरत नसे . डफाच्या ठेक्यावर बेधुंद होऊन नाचणाऱ्यांवर उपस्थीत महीला पूरुष रेवड्यांची उधळण करत व त्या उधळलेल्या रेवडया प्रसाद म्हणून खाण्यात अबालवृद्ध धन्य मानत. परंतु हळू हळू TV ने व सुशीक्षीत पणाचा आव आणण्यात व्यस्त आपण, या जून्या परंपरेकडे दूर्लक्ष केल्याने हि परंपरा बंद पडली .

   परंतु या संपलेल्या परंपरेचे पूर्न जीवन करण्याचा चंग येथील काही युवकांनी १० वर्षांपूर्वी बांधला व शिमग्यापूर्वी महिनाभर जुन्या जाणत्या जेष्ठांना बरोबर घेत त्यांच्या मार्गदर्शनात सराव करत नाचण्याच्या  वेग वेगळया चाली शिकत याचे पूर्न जीवन केले व सुमारे २०-२५ जणांचा संघ करून धूलिवंदनाला हि परंपरा जोपासली . यामधे हरिहर केशव गोविंद देवस्थाननेही प्रोत्साहन व सहाय्य दिले . छोटया मूलांना यामधे सहभागी करुन गेल्या वर्षी सुमारे ४० तरुणांनी या पारंपारीक नृत्याचा आनंद घेतला .

    या वर्षी आणखी एक पाउल पूढे टाकत महिलांना एक महिनाभर या नृत्याचे प्रशिक्षण देत, धुलिवंदनाच्या दिवशी ३५ महिला व मुली आणी  सुमारे ४० पूरुष व मुले या पारंपरिक सोहळयात थिरकले . महिला व मुलींनी नऊवारी साडी नेसत व मुलांनी पांढरेशुभ्र कूर्ता पायजमा व गांधी टोपी घालून या नृत्यात सहभाग घेतला . त्यामुळे हा सोहळा अनुभवण्यासाठी प्रचंड जनसमुदाय उपस्थीत होता . पून्हा जूने दिवस आल्याचा अनुभव अनेकांच्या तोंडून निघत होता व या तरुणाईच्या प्रयत्नाना भरभरून दाद सर्वच स्तरातील महिला व पूरुषांकडून मिळत होती .ड फाच्या ठेक्यावर मनमुराद नाचणाऱ्या युवक युवतींना पाहून सर्वांचे पायही अपोआप हालत होते व त्यांच्या प्रयत्नांना तारीफ ही होत होती .एकंदर सर्वच चित्र बघून तरुण पिढी योग्य मार्गावर आहे असेच म्हणावे लागेल .