शेतकरी सेनेच्या माध्यमातून कदम यांनी शेतकऱ्यांपर्यंत शासकीय योजना पोहोचवाव्यात -मा. आ. शिवाजी कर्डिले

शेतकरी सेनेच्या माध्यमातून कदम यांनी शेतकऱ्यांपर्यंत शासकीय योजना पोहोचवाव्यात -मा. आ. शिवाजी कर्डिले

*शेतकरीसेनेच्या माध्यमातून कदम यांनी शेतकऱ्यांपर्यंत शासकीय योजना पोहचवाव्यात - मा.आ.शिवाजी कर्डिले* 

                शिवसेना प्रणित शेतकरीसेना राहुरी तालुका प्रमुखपदी देवळाली प्रवरा येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब कदम यांची निवड शेतकरी सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष धनंजय जाधव यांच्या आदेशाने शेतकरीसेनेचे जिल्हाप्रमुख रामभाऊ रहाणे यांनी निवडीचे पत्र दिले आहे.

               याच विषयास अनुसरून जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी बाळासाहेब कदम यांचा सत्कार केला.या प्रसंगी शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे,तालुका संपर्क प्रमुख अशोक तनपुरे,भा. ज.पा.जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष विनीत धसाळ,शिवसेना जेष्ठ नेते वसंत कदम उपस्थित होते.

               या प्रसंगी मा. आ. शिवाजी कर्डिले म्हणाले की शेतकरी हा समाज जीवनातील मुख्य घटक आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्यनेते ना.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व ना.अजित पवार यांनी अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतलेले आहेत. शासनाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जातात परंतु शेतकऱ्यांर्यंत या योजना पोहचत नाहीत.योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत न पोहचल्यामुळे शेतकऱ्यांना योजनेचा फायदा मिळत नाही.शासकीय योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शेतकरी सेनेचे नवनियुक्त राहुरी तालुका प्रमुख बाळासाहेब कदम यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. राहुरी मतदार संघात शासकीय योजना राबविताना अडचण भासल्यास सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे मा.आ. शिवाजी कर्डिले म्हणाले.

            या प्रसंगी शरद म्हसे,महेबुबभाई इनामदार,राजेंद्र म्हसे,जालिंदर मुसमाडे,तुपे मामा,महेंद्र उगले,रोहित नालकर, प्रशांत खळेकर, अनिल आढाव आदी उपस्थित होते.