राहुरी कारखाना निवडणुकीने भविष्यातील राजकीय समीकरण बदलणार , गोलिगत झालेल्या धोक्याने सर्वत्र नाराजी .

राहुरी कारखाना निवडणुकीने भविष्यातील राजकीय समीकरण बदलणार , गोलिगत झालेल्या धोक्याने सर्वत्र नाराजी .

राहुरी कारखाना निवडणुकीने भविष्यातील राजकीय समीकरण बदलणार ?

 

          नुकतीच राहुरी येथील डॉ.बा.बा.तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली.कारखाना निवडणुकी दरम्यान सुरवातील अमृत धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली असलेले कारखाना बचाव कृती समिती मंडळ सभासदांचा विश्वास संपादन करतील असा विश्वास व्यक्त केला जात होता.परंतु बचाव कृती समितीला पॅनल पूर्ण करण्यासाठी उमेदवार न मिळाल्याने मोठी निराशा झाली. त्यामुळे काही काळापुरते अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळाला प्रतिस्पर्धी नाही असे वातवरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला.त्यात भाजपा नेत्यांनी त्यांच्या मर्जीतील कार्यकर्त्यांना अर्ज काढून घेण्याच्या सूचना दिल्या.त्यात राजूभाऊ शेटे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळाचा पेनल पूर्ण झाल्यमुळे भाजपाचे माजी खा.सुजय विखे व जिल्हा बँकेचे चेरमन आ.शिवाजी कर्डिले हे शेतकरी विकास मंडळाला मदत करतील असे दिसत असतांना दि.२५ मे रोजी मा.खा.सुजय विखे यांनी आ.कर्डिले यांच्यासमोर कार्यकर्त्यांच्या बैठकीत कारखाना विषयावर कुठलेही वक्तव्य न करता कुणाला मदत करायची याबाबत मौन धरत बैठक उरकती घेतली.त्यात मा.खा.सुजय विखे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर एका चित्रफितीद्वारे कुणालाच पाठींबा नसल्याचे जाहीर करून टाकले.त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झाला.विखे यांच्या काही समर्थकांनी तालुक्यातील भविष्यातील राजकीय धोका ओळखून शेटे यांच्या पाठीशी असल्याचे भासविलेही परंतु निकालानंतर कोणी शेतकरी विकास मंडळाला मदत केली व केली नाही हे गटानुसार स्पष्ट झाले आहे.

 

        *निवडणुकीच्या निकाला नंतर जनसेवा मंडळाचे कार्यकर्ते राहुरी महाविद्यालयाच्या प्रांगणात गुलाल खेळून आनंद उत्सव साजरे करत असतांना राजूभाऊ शेटे यांचे सहकारी शिवसेना तालुका प्रमुख देवेंद्र लांबे,अॅड.भाऊसाहेब पवार,सतीश बोरुडे,सचिन शेटे,संदीप आढाव यांच्या सह इतर सहकार्यांनी गटानुसार शेवटचा निकाल हातात येईपर्यंत मतमोजणी केंद्र सोडले नाही.*

           निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अरुण तनपुरे,मा.मंत्री प्राजक्त तनपुरे,हर्ष तनपुरे यांच्या सह विजयी फेरी काढली.तर शेतकरी विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांची राजूभाऊ शेटे यांच्या संपर्क कार्यलयावर रात्री उशिरापर्यंत बैठक संपन्न झाली.  शेतकरी विकास मंडळाला कुणाचाही भक्कम पाठींबा नसतांना जनसेवा मंडळाकडे मोठी प्रचार यंत्रणा,निवडणुकीचा अनुभव,बाजार समितीची साथ,स्थानिक सर्व संस्थेमधील कामगार,माजी मंत्री,बाजार समितीचे सभापती,मा.नगराध्यक्ष,कारखान्याचे मा.चेरमन,व्हा.चेरमन,बहुतांशी पतसंस्थाचे अध्यक्ष,संचालक,मा.नगरसेवक,जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व मा.पदाधिकारी ,सदस्य हे या निवडणुकीत पूर्ण ताकतीने उतरले होते.तर शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे यांच्या सोबतील कुठल्याही प्रकारे मोठे नेते नसतांना किंवा मोठे आर्थिक पाठबळ नसतांना चांगली लढत देवून त्यांच्या मंडळाचे उमेदवार नवीन असतांना देखील प्रचंड मत मिळविण्यात यशस्वी झाले आहेत. राजूभाऊ शेटे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळाच्या मताधीक्यामुळे भविष्यातील तालुक्याचे राजकारण शेटे यांच्या भोवती फिरणार आहे हे सांगायला कोणत्याही ज्योतिष्याची गरज भासणार नाही हे निश्चित.

 

         दुसऱ्या बाजूला अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली विजयी झालेले जनसेवा मंडळा समोर डॉ.तनपुरे साखर कारखाना सुरु करण्याचे मोठे आवाहन समोर आहे.तनपुरे यांनी कारखाना पूर्ववत सुरु केल्यास पुन्हा तालुक्यातील सर्व सत्ता केंद्रे तनपुरे यांच्या हातात येण्यासाठी मार्ग मोकळा होणार आहे.उलट कारखाना चालू न झाल्यास आहे त्या उलट परिस्थिती निर्माण होवू शकते असे बोलले जात आहे.

 

           आगामी काळात राज्यात व केंद्रात महायुतीचे सरकार आहे.तनपुरे सध्या विरोधी गटात आहेत.डॉ.तनपुरे साखर कारखाना चालू करायचा असल्यास सत्ताधारी गटाची मदत घ्यावी लागणार आहे.त्यामुळे मा.मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडून गोडबातमी म्हणून सत्तेचा रस्ता कोणत्या गावातून जातो व कारखाना कोणाच्या माध्यमातून चालू होतो याकडे राहुरी तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे .