खुनाच्या गुन्ह्यातून महिलेची निर्दोष मुक्तता : दर्द से हमदर्द तक ट्रस्ट आणि अँड अनुप पाल यांनी बाजू मांडली..

खुनाच्या गुन्ह्यातून महिलेची  निर्दोष मुक्तता : दर्द से हमदर्द तक ट्रस्ट आणि अँड अनुप पाल यांनी बाजू मांडली..

खुनाच्या गुन्ह्यातून महिलेची  निर्दोष मुक्तता : दर्द से हमदर्द तक ट्रस्ट आणि अँड अनुप पाल यांचा पुढाकार.

मुंबई_प्रतिनिधी_प्रसाद घोगरे_९३७०३२८९४४.

सविस्तर_टिळक नगर पोलिस स्टेशन हद्दीत दिनांक ०१ एप्रिल २०१८ रोजी, अज्ञात इसमांकडून छोटेलाल मौर्य यांचा खून करण्यात आला होता. छोटेलाल मौर्य कांदा-बटाट्याच्या व्यवसाय करत होते आणि त्यांचे वेगवेगळ्या लोकांशी काही आर्थिक संबंध असल्याने हा खून कोणी केला याबाबत निश्चित माहिती नव्हती. त्यामुळे त्यांच्या मुलगा रामजी मौर्य यांनी टिळक नगर, मुंबई पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

पोलिस तपासादरम्यान गुन्हेगार सापडला नाही, त्यामुळे पोलिसांनी संशयाच्या आधारावर छोटेलाल मौर्य यांची पत्नी धनुदेवी यांना अटक केली. अटक झाल्यानंतर माननीय सत्र न्यायालयाने त्यांना जामिनावर सोडले होते.

प्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीदरम्यान, एकूण ७ साक्षीदारांच्या उलट तपासणी ॲड. अनुप कुमार पाल यांनी केली. या तपासणीदरम्यान, कोणत्याही साक्षीदाराने मयताच्या पत्नीविरोधात कुठलीही जबानी दिली नाही. संपूर्ण सुनावणीच्या प्रक्रियेतही असे कोणतेही पुरावे समोर आले नाहीत की मयताचा खून त्याच्या पत्नीने केला आहे. बचाव पक्षाने असे असे. मत मांडले की पोलिसांनी घरामध्ये चोरी झाली किंवा या अंगाने तपासच केला नाही, परिसरामध्ये सीसीटीव्ही होते तरी देखील फुटेज चा अभ्यास केला नाही, घरामध्ये फिंगर प्रिंट एक्सपर्ट ला बोलवून अन्य व्यक्ती येऊन गेल्याबद्दल चे पुरावे गोळा केले नाही. संशयाच्या आधारावर मयता च्या पत्नीला विनाकारण गुंतवले परंतु त्या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद असल्याचे कोर्टासमोर सिद्ध होऊ शकले नाही.

त्यामुळेच, संपूर्ण साक्षीदार तपासणीनंतर आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे बचाव पक्षाचे म्हणणे मान्य करून माननीय सत्र न्यायालयाने धनुदेवी यांना खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त केले आहे.



मुंबई सत्र न्यायालय येथे, जिल्हा न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांच्या समोर सदरील केस मध्ये आरोपीची बाजू अँड अनुप पाल यांनी भक्कमपणे मांडली, अँड अनुप पाल हे दर्द से हमदर्द तक ट्रस्ट चे स्वयंसेवक आहेत, आतापर्यंत संस्थे मार्फत शेकडो लोकांना विना मूल्य कायदेशीर मदत दिली आहे.