अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाने दिव्यांग यांची हेळसांड थांबवावी यासाठी प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने निवेदन

अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाने दिव्यांग यांची हेळसांड थांबवावी यासाठी प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने निवेदन

*अ.नगर जिल्हा ग्रामीण रुग्णालयाने दिव्यांगाची हेळसांड थांबवावी यासाठी प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने निवेदन* 

राहुरी ता प्रति - डॉ देवेंद्र शिंदे

राहुरी प्रतिनिधी: माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयात चे शल्य चिकित्सक

डाॅ. संजय घोगरे साहेब यांना दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी युनिक आयडी कार्ड ला आधार कार्ड लिंक करणे व मोबाईल नंबर लिंक करणे नवीन प्रमाणपत्र काढणे यासंदर्भात प्रहार दिव्यांग संघटनेचे राज्य उपाध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे जिल्हा सल्लागार सलीम भाई शेख यांच्यावतीने निवेदन देण्यात आले . राज्य व केंद्र शासनाच्या नियमानुसार दिव्यांग बांधवांना प्रत्येक तालुक्यातील संजय गांधी विभाग वारंवार ऑनलाईन प्रमाणपत्र ,मागणी होत आहे ते मिळण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी व युनिक आयडी कार्ड त्याला आधार कार्ड लिंक असल्याशिवाय कोणताही लाभ मिळणार नाही लवकरात लवकर अपडेट करावे अन्यथा संजय गांधी निराधार योजना बंद पडेल या भीतीपोटी . जिल्ह्या रुग्णालयात

   प्रत्येक बुधवारी पाच-सहा हजार दिव्यांग बांधव जिल्ह्यातून येत असतात त्यामुळे जिल्हा रुग्णालयात खूप गर्दी होत आहे त्यामुळे दिव्यांग बांधवांचे खूप हाल होत आहेत . दिव्यांगाची आर्थिक लूट व हिंडसाळ होत आहे त्यासाठी जिल्हा रुग्णालय यांनी प्रत्येक दिवशी एक तालुका याप्रमाणे तालुक्यासाठी ऑनलाईन यंत्रणा तयार करून शिबिरा मार्फत लवकरात लवकर दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी व युनिक आयडी ला आधार व मोबाईल नवीन दिव्यांग प्रमाणपत्र नवीन काढणे . लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे. कारण आपला जिल्हा कार्यक्षेत्राने फार मोठा असल्याने दिव्यांगाची हाल फार मोठ्या प्रमाणात होत आहे . शासनाकडुन संजयगांधी चे मिळणारे मानधान बंद होईल. 

दिव्यांगावर खुप मोठा आन्याय होत आहे हे सिव्हील चे अंधाधुदि कारभार वेळीच थाबवा अन्या 

माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार संघटनेच्या वतीने उग्र स्वरूपाचे अंदोलन छेडन्यात येईल असा इशारा प्रहारच्या वतीने करण्यात आलायावेळी राहुरी तालुका अध्यक्ष योगेश लबडे आजिज भाई शेख, कारभारी मुसमाडे, कुशिनाथ मुसमाडे, मुस्ताक शेख, केशरताई कराळे,आशाबाई शेख, 

आदी उपस्थित होते.