अति पावसामुळे पिकाचे नुकसान शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी -चंद्रशेखर घुले

अति पावसामुळे पिकाचे नुकसान शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी  -चंद्रशेखर घुले

 शेवगाव प्रतिनिधी -यशवंत पाटेकर.

शेवगाव तालुक्यात महिनाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे सध्या अतिदृष्टी दृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे तालुक्यातील खरीप पिकासह फळबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात पाऊस अद्यापही सुरूच असून शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या पिकाचे उत्पन्न हाती येण्याची परिस्थिती राहिलेली दिसून येत नाही. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या पिकाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी - आमदार चंद्रशेखर घुले यांनी केली.

तालुक्यात सध्या सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर ते आज शेवगाव येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी घुले म्हणाले की तालुक्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून कमी अधिक स्वरूपात पाऊस सुरू आहे त्यामुळे बऱ्यापैकी कपाशी. बाजरी. तूर. मुग .सोयाबीन. ऊस. व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने अनेक भागातील पिके पाणी साचून सडली आहेत तर पावसाचे पाणी वाहिल्याने पिकासह जमिनीचे देखील नुकसान झाले आहे.

बाजरी सोयाबीन मुगाच्या काढणीचा हंगाम सुरू आहे तर कापूस वेचण्या सही सुरुवात झाली आहे मात्र आठ दिवसापासून पाऊस उघडी देत नसल्याने शेतात पाय ठेवणे अशक्य झाले आहे. बियाणे खते व मशागतीवर प्रचंड खर्च होऊनही हाती उत्पन्न येण्याची शक्यता पावसाने दुरावली आहे.

त्यामुळे शासनाने प्रशासनांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देऊन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ अहवाल शासनास सादर करावेत व शेतकऱ्यांना त्वरित मदत जाहीर करावी .

अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशाराही घुले यांनी दिला आहे.त्यावेळी ज्ञानेश्वरचे संचालक काकासाहेब नरवडे. राष्ट्रवादीचे जिल्हा उपध्यक्ष अरुण लांडे .राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे. बाजार समितीचे संचालक संजय फडके. राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष ताहेर पटेल. शहराध्यक्ष कमलेश लांडगे .आधी उपस्थित होते.